Skip to main content

मातृभाषा

एक गंमत सांगतो,
सिंगापूर ला असताना बरेच जण सोबत मराठी होते. त्यामुळे एकमेकात मराठीच जास्त करून वापरत असू. पण आपल्याला बरेच इंग्रजी शब्द घुसवून बोलायची घाणेरडी सवय असते. त्यामुळे त्या चीनी, तामिळ, मलय लोकांना अंदाज यायचा की आम्ही काय बोलतोय. सावरकर आठवले🙏🏻, प्रत्येक शब्द मराठीत सुरू झाला. म्हणजे उदाहरण म्हणून...
project साठी प्रकल्प
Manhours साठी मनुष्यतास
Director साठी संचालक
Company साठी संस्था
Deputation साठी प्रतिनियुक्ती वगैरे.

एकूण एक शब्द मराठी बोलायचो. खूप मजा यायची आणि मातृभाषेचे महत्व जाणवायचे आणि अभिमान ही वाटायचा. तिथे असलेले तामिळ लोक स्वतःच्या भाषेतच एकमेकांशी बोलायचे, त्यांची भाषेविषयीची कट्टरता इतकी का होती तेही उमगायला लागले. मग अशी परिस्थिती तयार झाली की आम्ही काय बोलतोय, एकही शब्द इतरांना कळेना. तिकडेही भाषानिहाय गट होतेच. आपलाही एक गट तयार झाला.
महाराष्ट्रात असताना मातृभाषेचे महत्व काय.. हे मनात असले तरीही जाणवत नाही. पण तीच आपली ओळख असते, अस्तित्व असते.

©️विजयकुमार पानसरे

Comments

  1. Aagadi barobar... aamhi hi ha anubhav qatar la ghetala hota.. tujhya ya lekh ne junya aathavani punha dolya samore aalya.. dhanyawad tula

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशा

शोभावे दिस पुन्हा, ऊन सावल्यांनी भिजावे मन पुन्हा, चिंब चांदण्यानी सरावी उदासी, ल्यावा चैतन्याचा नूर मातीमोल सारा स्वार्थ, यावा मायेला बहर ओसरावा सर्व काठ, पुन्हा जीवन फुलावे देव घेऊन मस्तकी, लोका आनंदे डुलावे निवळाव्या साऱ्या चिंता, सुख पुरून उरावे लाख पाखरांचे थवे, उंच आकाशी उडावे दूर वाटेतले खोडे, व्हावे जीवन प्रवाही सुटतील सारी कोडी, जरी उरलीत काही व्हावे मळभही दूर, लख्ख उजेड आकाशी  गीत गाईन नव्याने, गाठ बांधुनी मनाशी ©️विजयकुमार पानसरे

परीक्षा

अभ्यास जरा जास्त आहे, दर पेपर ला वाटतं, सगळं वाचुन न झाल्याचं, शल्य मनात दाटतं, पेपर मधला एकही प्रश्न, ओळखीचा वाटत नाही, मनात भीतीशिवाय तेव्हा कोणीच बोलत नाही, तितक्यात कोप...

तू आणि मी

तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला जग पूर्ण दिसे फिके धुके परी तूच चोहीकडे मन गिरक्या घेऊनि बंदिश लेऊनी  निरागस बागडे!! क्षण एक तुला आठवुनिया हा जीव वेडावला तुझीच तू... माझाच मी... हे उमगले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला तव आठवाने फुले धरा मन चिंब भिजून जाई मन पवित्र प्रसन्न मोहक वाटे शुभ्र आकाश निळाई पक्षांची किलबिल जणू सूरताल धरी वनराई जणू चित्ती कोणी कवी रचितसे कोमल श्यामला... तुझीच तू... माझाच मी... हे उम ग ले ना मला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला *** तुझीच मी... माझाच तू... सुचवू कसे मी तुला, मन उंच नभी घेऊनिया, तव कल्पनेचा झुला छाया तुझी विश्रांत ही सहवास तुझा हवाहवा तव आभासेही श्रावण ये ग्रीष्मात फुले गारवा संगे तुझ्या उभी असे तव हात हाती दिला प्रेमळ तूही प्रतिसाद दे स्वीकारूनिया म ज ला, जणू निश्चल सागर कवेत घेई सरिता चंचला तुझीच मी... माझाच तू... कळले तुला अन् मला, मन उंच नभी घेऊनिया, चल कल्पनेचा झुला ©️विजयकुमार पानसरे